सावंतवाडी /-
पावसाळ्याच्या कालावधीत कळणे येथील मायणी बंदच असते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कळणे येथील मायनिंग बंद करण्यात आली हे येथील लोकांची दिशाभूल करण्या सारखे आहे असे मत डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मांडले. तसेच ते बोलताना पुढे म्हणाले कळणे येथील खाण कायमची बंद करा व डिस्ट्रिक मायनिंग ऑफिसर्सची ऍण्टी करप्शन मार्फत चौकशी लावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. दरम्यान सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरातील मुलांकडे अफू गांजा सापडणे ही गंभीर गोष्ट असून शहरातील युवा पिढी बाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.