✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

येत्या १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक (जिजामाता चौक) कुडाळ यांच्या स्मारका कडून स्वतंत्रवीर सावरकर यांची गौरव यात्रा निघणार असून या यात्रेचा समारोप बाबा वर्दम रंगमंच येथे होणार आहे.या यात्रेच्या समारोप प्रसंगी श्री.शरद पोंक्षे यांचेकडून वीर सावरकर यांच्या जीवन चरित्र (सावरकर विचार दर्शन) कथन होणार आहे. तरी आपण सर्वांनी,सावरकर प्रेमींनी आपल्या मित्र परिवारांनी या कुडाळ शहरातून निघणाऱ्या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आव्हान तथा आयोजक श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठान,कुडाळ,देशप्रेमी नागरिक मंच,शिवप्रेमी संघटना यांच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी रणजित देसाई, मिलिंद देसाई, बंड्या सावंत, विवेक मुतालिक, विष्णू खोबरेकर, विवेक पंडित, देवेश रेडकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page