कुडाळ तहसिलदार आमोल पाठक यांनी मंडळ कार्यालयात केले आयोजन..

कुडाळ /-

शिवसेने शिवसंपर्क अभियान गावागावात घेऊन ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दीला यावेळी गावातील वारस तपास नोंदी वेळेवर होत नाही अशा तक्रारी आमदार वैभव नाईक यांच्या कडे ग्रामस्थांनी केली होती याचवेळी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना वारस तपास शिबिरांचे आयोजन मंडळ कार्यालयात करण्याच्या सुचना केल्यानुसार १६ व १७ सप्टेंबरला दोन दीवस मंडळ कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी निराधार समीती कुडाळ अध्यक्ष श्री अतुल बंगे यांनी दीली काही गावांतील लोकांनी वारस तपास नोंदी चार चार वर्षे तलाठी कार्यालयात देऊन झाल्या नाहीत आमदार वैभव नाईक यांच्या शिवसेना शिवसंपर्क अभियाना मध्ये प्रत्येक सजा मधील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या त्यानुसार मुंबई चाकरमानी मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी दरम्यान गावी येत असल्याने चाकरमान्यांना सुध्दा या शिबिरास उपस्थित रहाता यावे म्हणून हा कालावधी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार ठेवला असल्याची माहिती श्री बंगे यांनी दीली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page