कुडाळ /-
तौक्ते चक्री वादळाचा फटका हा सर्वांनाच बसला आहे.कुडाळ शहरातील काही भाग अजूनही अंधारातच आहे.कुडाळ शहरातील बर्याच ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही.काही भागात अजूनही लाइट नाही ,तर पाणी नाही अशी परिस्थिती कुडाळ शहरात आहे. विद्युत वितरण कंपनी चे अधिकारी व कर्मचारी भर पावसात लाइट जोडणीचे काम करत आहेत.करत आहे त्यांचे खरोखरच कौतुक आहे.कुडाळ शहरातील आंबेडकरनगर, मस्जिद मोहल्ला, कवीलकाटे भाग अजूनही अंधारात आहे.आहे.आज चार दिवस झालेत. अजूनही आंबेडकरनगर, मस्जिद मोहल्ला, कविलकाटे, या भागातील लाइट अजून आलेली नाही.सर्व नागरिक लाईट च्या प्रतीक्षेत आहे.M S E B प्रशासनाने लवकर विजेची वेवस्था करावी नागरिकांनमधून मोठी मागणी होत आहे.