सावंतवाडी /-
बाजारपेठेतील स्टॉल काढून जप्त करण्यात आलेले सामान पंचनाम्याच्या कागदपत्रांसहीत पुन्हा मिळावे, यासाठी रवी जाधव यांनी सावंतवाडी नगरपालिकेसमोर भर पावसात उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत पंचनाम्याच्या कागदपत्रासहित जप्त केलेले सामान आणि बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा मिळत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. या उपोषणाला माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी देखील पाठिंबा दिला आहे.
