वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी सुशांत खा॑डेकर , वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी पाहणी केली.यामध्ये तालुक्यातील आडेली भटवाडी,मठ सतयेवाडी आदी ठिकाणी त्यांनी भेट देऊन पाहणी केली.याबाबत नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत ,कुठलाही शेतकरी भरपाईपासून वंचित राहता नये आदी सूचना त्यांनी तलाठी,कृषी अधिकारी यांना केल्या. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अडसूळ, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड आदी उपस्थित होते.यावेळी मठ सरपंच तुळशीदास ठाकूर,आडेली सरपंच समिधा कुडाळकर,तलाठी,ग्रामसेवक, कृषी अधिकारी, कृषी सहायक आदीसह,ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page