वेंगुर्ला/-
वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग या तीन तालुक्याचे तहसीलदार यांची भातशेतीचे अतिवृष्टी नुकसान बैठक संपन्न झाली आहे.यात भातशेतीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनाम्यासंदर्भात प्रांत सुशांत खांडेकर यांनी सावंतवाडी येथे पदाधिकारी समवेत बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.या बैठकीस वेंगुर्ला, सावंतवाडी,दोडामार्ग या तीन तालुक्याचे तहसीलदार, तिन्ही तालुका गटविकास अधिकारी, तिन्ही तालुका कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.