कणकवली /-

भारतीय जनता पार्टीने टोल विरोधी केलेल्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यात फार मोठे यश आले आहे. १ जून पासून कणकवली ओसरगाव येथे सुरु होणारा टोल तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आला आहे.

उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, टोल कंपनीचे अधिकारी, महसूल प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त तसेच टोल विरोधी तक्रार असणाऱ्या सर्व घटकांना एकत्र घेऊन याविषयी बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर योग्यती प्रक्रियेवा केली जाईल. तोपर्यंत उद्या पासून होणारी टोलवसुली थांबवण्यात आली असल्याची माहिती कणकवलीच्या प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणावर ओसरगाव येथे असलेल्या टोल नाक्यावर १ जून पासून टोल सुरु केला जाणारा आल्याची माहिती कंपनीने दिली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी प्रांत अधिकारी यांना जाऊन प्रत्यक्ष भेटले व १ जून पासून टोल वसुली केल्यास गंभीर परिणाम होतील, त्यापूर्वी प्रशासन अधिकारी आणि सर्वांची एकत्रित मीटिंग घ्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी द्या. बैठक झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. अशी मागणी केली होती या मागणीनुसार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून एकत्रित बैठकीचे विनंती केली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल असे ठरविण्यात आले.सायंकाळी उशिरा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यक्षेत्र कोल्हापुर चे अधिकारी पी. डी. पंदरकर यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. जनतेचा उद्रेक होऊनये याचा विचार करून बैठकीत निर्णय होईपर्यंत उद्यापासून होणारी टोल वसुली स्थगित केली आहे. अशी माहिती प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page