बांदा /-

कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा- इन्सुली भागात पाणी येऊन येथील लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. यावेळी त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. यामुळे बांदा, इन्सुली भागातील लोकांनी जीव धोक्यात घालत, आपले जीव वाचवले होते. या घटनेनंतर अमित सामंत यांच्या माध्यमातून बांदा, इन्सुली भागातील लोकांसाठी ‘लाईफ जॅकेट’ पुरविण्यात आली होती. यावेळी बांदा, इन्सुलीत ग्रामस्थांना अलर्ट करण्यासाठी सायरन देण्याचा, तसेच आपत्कालीन किट देण्याचा शब्द अमित सामंत यांनी दिला होता. त्यानुसार शुक्रवारी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते बांदा, इन्सुलीतील मंडळांकडे हे सायरन सुपुर्द करत सामंत यांनी दिलेला शब्द पुरा केला आहे. साई भक्त मंडळ, कट्टा कॉर्नर मंडळ बांदा, इन्सुलीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळाकडे हे सायरन देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत अमित सामंत यांनी केलेल्या कार्याच जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कौतुक केले. यावेळी बांदा, इन्सुलीवासियांनी त्यांचे आभार मानले. तर गावासाठी केलेल्या मदतीबद्दल बांदा सरपंच अक्रम खान यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बांदा सरपंच अक्रम खान, बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, जिल्हा उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, राष्ट्रवादी युवा नेते असलम खतिब, बांदा ग्रामस्थ राकेश केसरकर, प्रितम हरमलकर, सुशांत पांगम, इन्सुलीचे श्री. पेडणेकर, श्री. शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, नवल साटेलकर, श्री. नाईक, श्रीम. पांगम, आगा, संजय पालव, चेतन वेंगुर्लेकर, संजय भाईप, बाळु परब आदी बांदा, इन्सुली ग्रामस्थ उपस्थित होते.,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page