कणकवली /-
चिपळून येथील पूरग्रस्तांना स्वराज्य गृप सिंधुदुर्ग यांच्यामार्फत मदतीचा देण्यात आला. चिपळूण येथील कोंडे गावामध्ये हीमदत देण्यात आली आहे. यामध्ये पाणी बॉक्स, तूरडाळ, कपड्याचे आणि अंगाचे साबण, कोलगेट, तांदूळ पीट, गव्हाचे पीट, बिस्कीट पुडे तसेच दैनंदिन जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंचा पुरवठा चिपळूण मधील कोंडे गावातील पूरग्रस्तांना करण्यात आला. यावेळी उपस्थित कोंडे गावातील उपसरपंच हसन खान, माजी सरपंच शशिकांत साळवी, स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्गचे सदस्य प्रसाद सुखटणकर, किरण मालपेकर, ऋषिकेश मालपेकर, संदीप मडव, राजू आलव आणि कोंडे गावातील पूरग्रस्त उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा चिपळूण तहसीलदार यांच्या सुचनेनुसार कोंडे गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला. कोंडे गावातील उपसरपंच व पूरग्रस्तांनी स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्गचे आभार मानले आहेत.