कुडाळ /-
सध्याच्या स्थितीत वाढत्या करोनाच्या प्र|धुरभवा मुळे सिंधुदुर्घची स्थिती दिवसेन दिवस खराब होत चाललेली आहे,त्यात वेंगुर्ला डेपो मध्ये कायम स्वरूपी डेपो मॅनेजरची नेमणूक न केल्यामुळे तिथली स्तिथी रोजच्या रोज अजूनच बिकट होत आहे.संपूर्ण करोभर अंदाधुंदी सुरू असून,अनेक कामगारांना अजून लसपण दिली गेलेली नाहीं.त्यात अनेक कामगारांचा निगेटिव्ह रिपोर्ट पण त्यांच्या कडे नाहीत श|शनच्या आदेश|प्रमाणे हा मनमानी कारभारा मूळ इतर कामगारांचा तसेच आज प्रवाशांचा जीव धोक्यात आले आहे ,त्यात परत जास्त कमाई होण्या साठी गोव्याला जाणाऱ्या फेऱ्यापण वाढवल्या गेल्या आहेत.त्यामुळे बस ड्राइवर कंडक्टर पासून ते प्रवाश्यांपर्यंत सगळ्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे.आधीच गोवा राज्यात अनेक रुग्ण आधीच सापडत असून कामगारांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन दबावाखाली काम करून घेतले जात आहे.गाव तिथे एसटी असल्या मुळे आता जरी किती ही कर्फ्यु गावात लावला तरी एसटी मुळे ह्या रोगाचा प्रसार सहज होऊ शकतो लवकरात लवकर जिल्हा पोलिसअधीक्षक आणि जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देऊन ह्या गोष्टीची शहानिशा करायची विनंती करणार आहे,तसेच तहसीलदार आणि नगराध्यक्ष ह्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार असल्याचे आज कुडाळ येथे बनी नाडकर्णी यांनी मीडिया शी बोलतात सांगितले.