✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्ग.

नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या राज्यातील १ कोटी ७ लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे.आतापर्यंत ६९ टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

शिक्षणाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता १ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पाठ्यपुस्तके देण्यातयेणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. या वर्षी केरळ राज्याच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकांमध्ये नोंदी ठेवण्यासाठी वह्यांची पानेही असणार आहेत.त्यामुळे पुढील वर्षी पाठ्यपुस्तकांची छपाई नव्याने करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page