कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ असतानासुद्धा काँग्रेसचा नगराध्यक्ष बसवावा लागला हेच आमदार वैभव नाईक यांचे अपयश आहे,अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाचा प्रयत्न फसला असला तरी, भविष्यात नक्कीच या ठिकाणी भाजपाचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कुडाळ येथे श्री. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, कुडाळ नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसचा नगराध्यक्ष बसला असला तरी मात्र, कुडाळवर शिवसेनेचा भगवा फडकलाच नाही, शहरावर काँग्रेसचा झेंडा फडकला, त्यामुळे शिवसेनेने उड्या मारू नयेत, असाही टोला त्यांनी लगावला.

कुडाळ नगर पंचायतीत शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांनी घाणेरडे राजकारण केले. काँग्रेसच्या नगरसेवकांना अत्यंत वाईट वागणूक मिळाली. त्यांच्या नातेवाईकांना कणकवलीत डांबून ठेवण्यात आले. इतके घाणेरडे राजकारण आजपर्यंत कधी झाले नाही. वैभव नाईक हे दिवसागणिक खालची पातळी गाठत चालले आहेत, अशी टीका त्यांनी केली.शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून आले तरी शेवटी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बसवावा लागला हीच मोठी आमदार नाईक यांच्या वर नामुष्की आली आहे. स्वतः काँग्रेसचा नगराध्यक्ष बसून आमदार नाईक यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादाला तिलांजली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page