वेंगुर्ला / –

अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा – काजू नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजु मोहोरावर प्रचंड प्रमाणात परिणाम झाला आहे.अनेक शेतकरी व बागायतदारांनी बॅंक कर्ज उचल करुन औषधे, कीटकनाशके खरेदी केली. अवकाळी पावसाळ्यापुर्वी आंबा – काजु कलमांवर मोठ्या प्रमाणात फवारणी झाली होती. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा व बागायतदारांचा हा खर्च वाया गेला असुन आर्थिक नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे आलेला मोहोर खराब झाला असुन त्याचा परिणाम आंबा – काजु उत्पादनांवर होणार आहे. शेतकरी – बागायतदारांनी स्वतः चा घातलेला पैसा, बॅंक कर्जाद्वारे उभारलेला पैसा याद्वारे आर्थिक नुकसान होणार आहे. शासकीय यंत्रणेमार्फत या नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना  शासकीय मदत, पिक विमा संरक्षणाचा लाभ मिळवता येईल तरी या दृष्टीने शासन स्तरावर पाठपुरावा करुन तात्काळ कार्यवाही व्हावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.तसेच शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास व शेतकरी – बागायतदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्यास भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु ,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, 
प्रदेश का.का. सदस्य शरदजी चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महिला मोर्चाच्या सारिका काळसेकर, किसान मोर्चा ता.सरचिटणीस सत्यवान पालव, आंबा बागायतदार प्रताप गावसकर, संजय वेंगुर्लेकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, माजी पं.स.सदस्य पुरुषोत्तम परब, रविंद्र शिरसाट, शेखर काणेकर, ओंकार चव्हाण, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर , युवा मोर्चा चे हेमंत गावडे, प्रमोद शिरोडकर,रमेश परब, चंद्रकांत परब, गोविंद परब, सूर्यकांत परब इत्यादी आंबा – काजु बागायतदार व किसान मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page