सिंधुदुर्ग /-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पायगुणांमुळेच रखडलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचा प्रकल्प मार्गी लागता. आता या विमानतळामुळे कोकणचा विकाससुद्धा निश्चित आहे, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चिपी विमानतळाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केला.
गेल्या पाच-सहा वर्षात या विमानतळाच्या पाठपुराव्या शिवाय खासदार विनायक राऊत यांचा एकही महिना गेला नाही, तर त्यांच्यासोबत जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी यासाठी सुरवातीपासून प्रयत्न केले. त्यामुळे या प्रकल्पात सर्वांचेच योगदान आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
