वेंगुर्ला /-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय लोकांचे नोंद ठेवण्याचे आदेश अलिकडेच दिले आहेत. केंद्र सरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवेच्या अटी) अधिनियम, १९७९ हा कायदा लागु केला आहे.परंतु या कायद्याची अंमलबजावणी वेंगुर्ला तालुक्यात होताना दिसत नाही.
आज तालुक्यात विविध क्षेत्रात परप्रांतिय लोक काम करत आहे.या परप्रांतियात मजुर म्हणुन काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
उत्तरप्रदेश,बिहार,आसाम,गुजरात मध्यप्रदेश,केरळ,झारखंड या राज्यातील परप्रांतिय लोक अनधिकृत पणे राहत आहेत.स्थलांतरित कामगार कायद्याप्रमाणे त्यांची नोंद नाही सबब सदर बाब गंभीर स्वरुपाची असुन वेंगुर्ला तालुक्यात या परप्रांतियांकडून येणाऱ्या काळात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडू शकतात.जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग येथे गेल्या दोन तीन वर्षात परप्रांतियांकडून खुन, दरोडा या सारखे गुन्हे घडले आहेत. अजुनही काही आरोपी बेपत्ता आहेत.
पोलिस यंत्रणेचा बराच कालावधी आरोपींना शोधण्यासाठी जात आहे.म्हणुन वेंगुर्ला तालुक्याला भविष्यात होणारा धोका लक्षात घेता परप्रांतीय लोक ज्यात प्रामुख्याने मच्छिमारीसाठी येणारे खलाशी,बांधकाम कामगार,वाळु कामगार,चायनीज सेंटर मध्ये काम करणारे तसेच आंबा बागेत काम करणारे नेपाळी, हॉटेल मध्ये काम करणारे मजुर, चिरे खाण कामगार, विंधन विहीर(बोअरवेल) खोदणारे कामगार, केशकर्नालय कामगार या सर्वांची नोंद फोटो ओळखपत्रासहीत होणे आवश्यक आहे.नोंद होण्यासाठी तहसिल कार्यालय व पोलिस यंत्रणा यांनी सहमतीने नोंदणी अधिकारी प्राधिकृत करावा.अशी आपणास आम्ही नम्र सुचना करत आहोत.
तसेच नोंदणी अधिकारी नोंद करून कायद्याची अंमलबजावणी करत असताना जे लोक १५ वर्षापासून वास्तव्यास राहत आहेत व ज्यांचे स्थानिक पत्यावर आधार कार्ड,मतदान ओळखपत्र आहे अश्या नागरिकांना नोंदणी पासून सवलत द्यावी.
तरी मा.मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची आपलेकडून त्वरीत अंमलबजावणी होणे करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वेंगुर्ल्याच्या वतीने आम्ही सर्व मनसे पदाधिकारी हे पत्र देत आहोत यावेळी मनसेचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सनी बागकर , तालुका सचिव आबा चिपकर, शाखाअध्यक्ष आरवली टांक सहदेव फोडनाईक , उपशाखा अध्यक्ष वेंगुर्ला शहर प्रथमेश नाईक .