सिंधुदुर्ग /-

वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते.मात्र या नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. त्यामुळे सदर नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ब्यामध्ये व्हावे ही दोन्ही जिल्ह्यातील विध्यार्थी व पालक यांची मागणी होती.याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसेच बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ चे चेअरमन श्री उमेश गळवणकर यांनी खासदार विनायक राऊत साहेब व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग व रत्नागिरी मध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात खासदार विनायक राऊत साहेब व ना. उदय सामंत व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने national testing agency चे चेअरमन Mr. M. S. Ananth यांचाकडे अनुक्रमे दिनांक 18 मार्च 2021व दिनांक 206ऑगस्ट 2020 च्या पत्रान्वये व केंद्रीय मंत्री श्री संजय धोत्रे यांच्याकडे दिनांक 20 ऑगस्ट 2020 च्या पत्रान्वये सातत्याने पाठपुरावा केला होता.व त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया जी केंद्र सरकारची national testing agency,राज्य शासनाची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून होते ती वेळोवेळी पाठपुरावा करून पूर्ण करून घेतली आणि त्यामुळेच संपूर्ण देशामध्ये नीट परीक्षेची नवीन 55 केंद्रे मंजूर करण्यात आली त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page