कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील चक्रीवादळाने विद्युत खांब मोडून पडले त्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे आज कुडाळ मराविम कडुन विद्युत पोल ग्रामीण भागात रवाना झाले विशेष म्हणजे शिवसेना पदाधिकारी यांनी आज सकाळी विद्युत मंडळ कार्यालयाकडे जाऊन वाहतुक करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली त्यामुळे विजेचे लोखंडी पोल ग्रामीण भागात पोचल्यानंतर विजेची कामे युध्द पातळीवर करा अशा सुचना आमदार वैभव नाईक यांनी अधिका-यांना दील्या यावेळी शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, माजी जि प सदस्य संजय भोगटे, गोवेरीचे शिवसैनिक सत्यवान हरमलकर उपस्थित होते.