सावंतवाडी /-
राज्यात संचारबंदी नियम लागू असून देखील सावंतवाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यंत्रणेने धडक रॅपिड ऍक्शन सुरू केली आहे. इतर शहराप्रमाणे सावंतवाडीतील विनाकारण सुरू असणारी वर्दळ रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांनी दिली आहे.