कणकवली /-
सध्या मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे.परंतू नांदगाव तीठा येथील बॉक्स पुलाचे काम अजून सुरू असल्याने मुख्य मुंबई -गोवा वाहतूक सर्व्हीस रस्त्याने सुरू असून सर्व्हीस रस्ता अर्धा डांबरीकरण नसल्याने वाहनांची सतत रेलचेल होवून उन्हामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे .व सिमेंट सारखी धुळ पसरत असल्याने येथील बाजार पेठ म्हणा नागरीकांच्या आरोग्यास धोका निमार्ण झाला असून सध्या मलमट्टी म्हणून दोनदा टँकरने पाणी मारणे सुरू असले तरी पाणी अर्ध्या तासात सुकत असल्याने धुळीचे साम्राज्य पसरत आहे .
याबाबत अधिक वृत्त अस की, नांदगाव येथे एकाच सर्व्हीस रस्त्याने तसेच मुंबई गोवा हायवेची वाहतूक सुरू आहे.पलीकडील सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न न सुटल्याने एकाच सर्व्हीस रस्त्याने वाहतूक सुरू आहे येथील र्बॉक्स पुलाचे कामही उशीरा सुरू झाल्याने तेही अद्याप सुरूच आहे . पावसाळयामध्ये येथेच डांबरीकरणाने पॅचप केले होते नंतर सर्व उखडल्याने चिखलाचे साम्राज्य पसरत होते.आता पुर्णत: पाऊस गेल्याने नांदगाव तिठा परिसरामध्ये हा अर्धवट सर्व्हीस रस्ता डांबरीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे नांदगाव तीठा परिसर फोंडा रस्ता पूर्णत: या धुळीमुळे माखला आहे व धुळ सिमेंट खडी असल्याने सर्वत्र पांढरी धुळ पसरत आहे .यामुळे येथे असलेल्या व्यापारी वर्ग ,रिक्षा व्यवसाईक , पंचक्रोशीतील बँक कामासाठी येणारे नागरीक मग यात ज्येष्ठ नागरीक आहेत . यांना हा त्रास जाणवत आहे .या धुळीचा वेळीच बंदोबस्त करून सर्व्हीस रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत असून या धुळीमुळे आमच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थीत केला जात आहे.