✍🏼लोकसंवाद /-आचरा.
स्वतः चे लग्न होत नाही म्हणून चंद्रशेखर भालचंद्र मुळये (वय-३६) याने ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर गोळी मारुन घेत जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील मठबुद्रूक लिंग्रस वाडी येथे काल दुपारी घडली. याबाबतची खबर त्याचे वडील भालचंद्र रघुनाथ मुळये यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बंगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करत आहेत.
