✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

नेमळे एरंडवाकवाडी येथील शेतकरी गुंडू अनंत कोरगांवकर यांच्या घराशेजारील गोठ्यात रात्रौ १ वाजताच्या सुमारास बिबट्या घूसून दोन बकऱ्या फस्त केल्या. त्यामूळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कोरगांवकर यानी अलीकडेच शेतीव्यवसायाला पूरक म्हणून शेळीपालन करण्याचे करण्यासाठी त्यांनी कर्ज घेऊन दोन शेळ्या विकत घेतल्या होत्या. मात्र, बिबट्याने दोन्ही शेळ्या गोठ्यातच मारुन टाकल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे नेमळे गावातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याविषयी वनविभागाचे वनरक्षक पाटिल ,बबन रेडकर पशुवैद्यकिय अधिकारी धनंजय कुठार याना कळविताच घटना स्थळाची पाहणी करुन पंचनामा केला याची नुकसानभरपाई लवकरातलवकर मिळवून द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्थ शेतकरी गुंडू कोरगांवकर यानी वनविभागाकडे केली आहे तसेच गोठ्यात घूसून जनावरे फस्त करणाऱ्या बिबट्याचा त्वरीत बन्दोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे. यावेळी वनरक्षक रमेश पाटील, बबन रेडकर, पशुवैद्यकिय अधिकारी धनंजय कुठार तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page