✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

विवाहित महिलेने आज येथील मोती तलावात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या जागरूक नागरिकांनी तलावा काठीच तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला. हा सर्व प्रकार तिच्या पतीसह दोन मुलांसमोरच तिने केला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. परंतु त्या दोघांनी आमचा घरगुती वाद आहे, असे सांगून त्या ठिकाणाहून जाणे पसंत केले. संबंधित महिलाही ही सह्याद्री पट्ट्यातील एका गावात राहणारी आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिला आपल्या पती व दोन मुलांसह येथील न्यायालयाच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये काही काळ बसल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांची चर्चा सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले होते. त्यानंतर अचानक तिने तलावाच्या दिशेने धाव घेत तलावात उडी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील जागरुक नागरिकांनी तिला काठावरच रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर काही काळ ती अत्यवस्थ बनली होती. दरम्यान परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा सर्व प्रकार कळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संबंधित महिलेच्या पतीने पोलिसांना उद्धट उत्तरे देण्यास सुरुवात केली. तसेच आमचा घरगुती वाद आहे, त्यामुळे आम्ही बघून घेऊ, असे सांगत त्या ठिकाणावरून जाणे पसंत केले. मात्र हा सर्व प्रकार कोणत्या कारणावरून घडला हे कळू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page