शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन..
कुडाळ /-
रांगणा तुळसुली येथे बैलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात विलास रामचंद्र शेटये यांचा मृत्यू झाला होता. आज रांगणा तुळसुली येथील शेटये कुटुंबियांच्या घरी कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेत प्रमोद विलास शेटये हे देखील गंभीर जखमी झाले होते. आ. वैभव नाईक यांनी त्यांची विचारपूस करत कुटुबियांना धीर दिला व शेटये कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.