मालवण /-

आडवली-मालडी मतदारसंघात श्रावणमध्ये भाजपला खिंडार शिवसेना संपविण्याच्या अनेक वेळा वल्गना करण्यात आल्या. शिवसेना संपविण्यासाठी अनेकांना ताकद देण्यात आली. परंतु शिवसेना कधीच थांबली नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात चांगले काम सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही शिवसेना वाढतच राहणार आहे. अलिकडेच भाजपचे असगणी सरपंच हेंमत पारकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.आता मालवण तालुक्यातील श्रावणमधील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचे पक्षात स्वागत आहे.असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. भाजप पक्षाच्या श्रावण गावातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी आज कणकवली विजय भवन येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी योगेश परब,महेश मधुकर परब,संजय परब,दिपेश परब,मनोज पाडावे,विवेक धुरी,भुषण परब, भालचंद्र परब,सचिन परब, कृष्णा परब,विशाल परब,महेश परब,संतोष परब,सुमीत परब,प्रथमेश परब,दिक्षात परब,उमेश परब,संकेत परब,संतोष परब,मंदार परब,शंकर परब,आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. संपूर्ण आडवली-मालडी विभाग भगवामय केल्याशिवाय राहणार नाही. भाजपाला असे अनेक धक्के येत्या काळात देण्यात येणार आहेत असे यावेळी विभाग प्रमुख बंडू चव्हाण यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उप तालुकाप्रमुख बाबा सावंत, विभाग प्रमुख बंडू चव्हाण, माजी विभाग प्रमुख दीपक राऊत, विभाग संघटक संतोष घाडी, उपविभागप्रमुख प्रवीण परब, दुलाजी परब, नाना गुरूजी विजय पालव आदींसह शिवसैनिक उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page