रत्नागिरी /-

रत्नागिरीतील पावस मेर्वी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची प्रचंड दहशत आहे. माणसांवर बिबट्याने हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. हल्ला झाल्यावर प्रशासन काही दिवस उपाययोजना करते मात्र बिबट्याचा बंदोबस्त होत नाही.

हा हलगर्जीपणा मनुष्याच्या जीवावर बेतू शकतो. प्रशासन बिबट्या नरभक्षक होण्याची वाट पहात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत जांभुळआड पूर्णगड येथील जयंत फडके यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्य करणारी पोस्ट लिहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page