मुंबई /-
भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगावातील भगवान गडावरून दसऱ्यानिमित्त मार्गदर्शन केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख टाळत विरोधकांवर निशाणा साधला. मला तोडण्याचा प्रयत्न झाला. माझं राजकारण संपल्याचा अपप्रचार करण्यात आला. पण मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन,” असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या,”तुम्ही धीर सोडू नका. कुठलाही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही., पक्षाचा विचार मोठा असतो, पण गोपीनाथ मुंडेसाहेब हे पक्षापेक्षा मोठे झाले, त्यांचं नाव पक्षातलेच नाही तर विरोधपक्षातले लोकंही घेतात,” असं त्यांनी सांगितलं.