वेंगुर्ला /-

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान तुळस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून वेंगुर्ले येथे पथनाट्यातून समाज प्रबोधन व जाणीव जागृती करण्यात आली. स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने १२ ते १९ जानेवारी दरम्यान सदर युवा सप्ताहा अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेहरू युवा केंद्र व वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने वेंगुर्ला येथील बस स्थानक,श्री साई मंदिर,दाभोली नाका,वेंगुर्ला बाजारपेठ, नाथ पै रॉड,बॅरिस्टर खर्डेकर रोड अशा सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून ‘अन्न वाचवा’ संदेश देत सामाजिक प्रबोधन करण्यात आले. दैनंदिन जीवनात अन्नाचे महत्व सर्वज्ञात आहे.परंतु अनेक शुल्लक घटनांनी होणारा अन्नाचा अपव्यय, त्याची कारणे, त्याचे सामाजिक परिणाम, यावरील उपाय अशा स्वरूपात संदेश देण्याच्या उद्देशाने आणि आजच्या युवकांची यासाठी असलेली भूमिका पथनाट्यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी दिव्यता मसुरकर, भाग्यश्री वेळकर,योगीता सावंत, तेजस्वी सावंत, वृषाली केरकर, योगिता आईर, हर्षा खवणेकर, हसरी आरावंदेकर,पूनम आईर,अंकिता कांबळी,अक्षता आईर,गौरवी आईर यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर, सहसचिव महेश राऊळ, किरण राऊळ, प्रतीक परुळकर,प्रवीण राऊळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page