✍🏼लोकसंवाद /- मुंबई.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत.त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.