लोकसंवाद /- कणकवली.

कणकवली शहरातील कणकनगर परिसरात मध्यरात्रीनंतर ४ ते ५ बंद घरे चोरट्यांनी फोडली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील काही घर मालक कणकवलीत दाखल झाल्यानंतर एकूण किती ऐवज चोरीला गेला याची निश्चिती होणार आहे. कणकवली शहरात गेल्या वर्षभरात सातत्याने चोरीच्या घटना होत आहेत. त्यानंतर काल मध्यरात्री पुन्हा एकदा शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यात अंकुश सावंत यांच्या बंगल्यातून चांदीचे दागिने तसेच इतर ऐवज लंपास झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page