✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
चौपदरीकरणाच्या मार्गामुळे खारेपाटण संभाजीनगर येथे असलेल्या सुमारे ५०० लोकवस्तीच्या वस्तीला तसेच टाकेवाडी येथील नागरिकांना रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे. तसेच या वाडीतील नागरिकांसाठी स्मशान भूमी तसेच गणपती विसर्जन ठिकाण हे हॉटेल मधूबन शेजारील नदीपात्रात आहे. तसेच शाळा, खारेपाटण बाजारपेठेत ये-जा करणे आणि आपल्या शेती मध्ये ये-जा करण्यासाठी महामार्ग ओलांडणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय
काणी रस्ता रुंदीकरणापूर्वी अस्तित्वात असलेला बस थांबा पूर्वरत उभारून त्या ठिकाणी मिडलकट देऊन रहदारी सुरक्षित करावी. तसेच संभाजीनगर टाकेवाडी ते मधुबन हॉटेल पर्यंत सर्विस रोड उभारून ग्रामस्थांना शेती, स्मशान भूमी, शाळा आणि गणपती विसर्जन इ. साठी रहदारी सुरक्षित करावी, अशा मागणीचे निवेदन आज बांधकाम उपअभियंता खारेपाटण यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गुरुप्रसाद शिंदे, मंगेश गुरव,प्राची इस्वलकर, सूर्या गुरव, देवानंद इस्वलकर आदी उपस्थित होत.