कणकवली/-

भाजपाचे आम. नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेतीची लावणी केली,तसेच बैलांचे जोत..(औत) धरून आपण पिढीचा शेतकरी आहोत याचे प्रत्यंतर आणून दिले.आम.नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत सकाळपासूनच नांगरणीस सुरुवात केली. बैलांना नांगर जुंपून जमिनीची उखळ घातली. त्याचप्रमाणे चिखल केला. त्यानंतर भात लावणी करण्यात आली . यावेळी त्यांच्यासोबत गावातील शेतकरी आणि भात लावणी करण्यासाठी महिला भगिनी मदतीला होत्या.

कोकणात भात लावणीचा हंगाम असून समाधानकारक पडणाऱ्या पावसात सर्वच शेतकरी भाताची लावणी करताना दिसतात आमदार नितेश राणे यांचे वरवडे हे गाव असून त्या ठिकाणी त्यांच्या शेतीत भात लावणीचे काम सुरू आहे याच दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते भात लावणीचे काम सुरू असल्याने आज सकाळी नऊ वाजता वरवडे येथील शेतात गेले आणि शेतीच्या कामात हातभार लावला शेतीच्या बांधावर बसून त्यांनी न्याहारी सुद्धा केली.यावेळी जि. प. माजी अध्यक्ष गोट्या सावंत, पंचायत समिती माजी सभापती प्रकाश सावंत, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत, महेश गुरव, आनंद घाडी, सुभाष मालंडकर, अशोक घाडी, दीपक घाडी, रामा निर्गुण, प्रकाश घाडी, सत्यवान निर्गुण, गणेश परब, सुरेश घाडी आदी सह गावातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page