वेंगुर्ला /-

पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या या सलग दुस-यावर्षी स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यात प्रथम- सरिता पवार (कणकवली), द्वितीय- प्राजक्ता आपटे (वेंगुर्ला), तृतीय- अमृता दळवी (कणकवली), चतुर्थ- मृणालिनी देसाई, (धामापूर), पाचवा- मधुरा तिळवे (सांगली), सहावा-वैशाली मठकर (डोंबिवली) या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ व वीरधवल परब, वेंगुर्ला यांनी केले आहे. या स्पर्धेतील १ ते ६ क्रमांक प्राप्त कथांचा समावेश किरात दिवाळी अंकात केला असून या सर्वांना रोख रकमेसहीत अरुण सावळेकर लिखीत ‘नाट्यरंग‘ या दीर्घांकीकेची प्रत भेट म्हणून दिवाळी अंकासोबत दिली जाणार आहे. सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे किरात परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page