वेंगुर्ला /-
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत आज वेंगुर्ले पंचायत समिती येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास सभापती अनुश्री कांबळी,गटविकास अधिकारी उमा पाटील, पशुधन विकास अधिकारी विदयानंद देसाई, एकात्मिक बालविकास अधिकारी सामंत. सहा. लेकाधीकारी दिनकर चाटे,शिक्षण विस्तार अधिकारी वंदना परब, विस्तार अधिकारी संदेश परब,जि.पा.व.स्व.तज्ञ निलेश मठकर,अधिक्षक योजना संतोष चव्हाण, अधिक्षक आस्थापना कोरगावकर, स्वछ भारत मिशन द्रौपदी नाईक ,आश्विनी किनळेकर तसेच सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी स्वच्छता शपथ घेणेत आली व परिसर स्वच्छता करण्यात आली.
