रत्नागिरी /-

दोन दिवस चाललेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज सकाळपासून रत्नागिरीहून सुरु झाली आहे. यावेळी रत्नागिरीतील आंबा, काजू बागायतदारांशी नारायण राणेंनी संवाद साधला. बऱ्याच आंबा बागायतदारांनी यावेळी आपले प्रश्न मांडले. कोकणचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा उपयोग करणार आहे. तसेच बागायतदारांनी मांडलेले प्रश्न लवकरच सोडवणार, असे आश्वासन यावेळी नारायण राणेंनी रत्नागिरीकरांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page