✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
अतिवृष्टी काळात रस्त्यावर कळसुली- दिंडवणेवाडी धरणाचे पाणी आल्यामुळे सहा ते सात दिवस बंद असलेला मार्ग कुडाळ- पणदुर-घोडगे हा मार्ग अखेर आजपासून खुला करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर तहसीलदार अमोल पाठक यांनी धरणाचे पाणी प्रवाहने सोडून हा प्रश्न निकाली काढला. त्यामुळे मान्येकर व प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
