✍🏼लोकसंवाद /-मुंबई.
राज्यात सध्या मोठी सरकारी नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यात पोलीस भरतीही मोठ्या प्रमाणावर होणार असून याविषयी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.आता तृतीयपंथीयांनाही पोलीस होण्याची संधी प्राप्त होणार आहे.पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांनाही स्थान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर विचार करण्यासाठी ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. अखेर यावर निर्णय घेण्यात आला असून आता तृतीयपंथीयांनाही पोलिस होण्याची संधी मिळणात आहे. हे संबंधित उमेदवार पोलीस शिपाई व चालक पदासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी अधिकृत असलेल्या संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.