मुंबई /-

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या काही समर्थक आमदारांसह गुजरातात गेले आहेत.त्यामुळे ते भाजपात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांची पुढची भूमिका काय ? हे ते एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत. दरम्यान या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांनी सायंकाळी चार वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर उपस्थित राहावे,असे आवाहन केले आहे.तर काँग्रेसमध्येही बंडाळीची चर्चा आहे.तर ,त्यामुळे राज्यात पुढे नेमके काय होणार ? भाजप सरकार सत्ता स्थापनेचा दावा करणार का ? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page