नवी दिल्ली /-
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल करण्यात आले असुन या योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे.आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.म्हणजेच रेशनकार्डशिवाय आता किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.
