✍🏼लोकसंवाद /- राजापूर.

उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी केली. लोकांचा विरोध असल्यास रिफायनी होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आखल्या जात आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांनी दिले आहे. मी मन की बात करायला आलो नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

रिफायनरी गुजरातला न्या आणि आमचा एअर बस, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात आणि चांगले प्रकल्प गुजरातला गेले. हे चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हुकूमशाहीचा विचार केला तर हुकूमशाही मोडून काढू, असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page