कणकवलीत /-

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता. सकाळी अकरा नंतरही अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईसाठी अखेर तहसीलदार थेट रस्त्यावर उतरले इतर अधिकारी व ग्रामपंचायतीच्या मदतीने तहसीलदारांनी गुरुवारी दुपारी कलमठ येथील चार विक्रेत्यांवर कारवाई करत चार हजार रुपयांचा दंड •वसूल केला.ब्रेक दी चेन च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कलमठ येथील दोन भाजीविक्रेते, एक किराणामाल विक्रेते व एका कांदे विक्रेत्यावर गुरुवारी दुपारी तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. हजारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ वाहतूक पोलीस संदेश अबीटकर यांच्या पथकाने थेट कारवाईचा बडगा उचलला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोलावून घेत संबंधित चौघांवरही प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली व दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देत यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही तहसीलदार पवार यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page