वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील आसोली वडखोल सडा येथे व नजीकच्या भागात तीन दिवसापूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांचे आंबा कलमे ,काजू कलमे, माड, गवत,पाण्याची पाईपलाईन आदींचे मोठे नुकसान झाले होते.याबाबत आज गुरुवारी वेंगुर्ला एमएससीबी ऑफिस येथे आसोली, पाल व मातोंड येथील ग्रामस्थांनी भेट घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी पुढील कालावधीत अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, याबाबत
आवश्यक ठिकाणी तांत्रिक कामे लवकरच करण्यात येतील,असे आश्वासन संबंधित अधिकारी यांनी ग्रामस्थांना दिले.आसोली वडखोल सडा भागातील शॉर्टसर्किटमुळे आंबा-काजू बागायतीचे झालेल्या नुकसानीबाबत
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन संबंधित खात्याने ठोस निर्णय घ्यावा, याबाबत माजी सभापती सुनिल मोरजकर यांनी मागणी केली होती.गेल्या सात वर्षात येथील भागात आग लागून नुकसानी होण्याच्या घटना घडल्या आहेत,याबाबत पं. स.सदस्य सुनिल मोरजकर यांनी लक्ष वेधले होते.संबंधित
वेंगुर्ला एमएसइबीचे उपकार्यकारी अभियंता-एल.बी. खटावकर,कनिष्ठ अभियंता आर.जी.मुळे
व आसोली,पाल,मातोंड ग्रामस्थांसह सुनिल मोरजकर यांनी चर्चा केली.पुढील कालावधीत शेतकरी – आंबा ,काजू बागायतदार आदींचे नुकसान होऊ नयेत,यासाठी उपाययोजना करण्यात यावीत,अशी मागणी करण्यात आली.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी संभाव्य धोके उद्भवणार नाहीत,यादृष्टीने उपाय करण्यात येतील.यामध्ये आवश्यक ठिकाणी गार्डिंग,साफसफाई, कटआऊट, अर्थिग,सर्व्हिसिंग, देखभाल यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील,असे आश्वासन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले.यावेळी पं. स.सदस्य सुनिल मोरजकर,आसोली सरपंच रिया कुडव,पाल सरपंच मेस्त्री,अशोक धाकोरकर,रामदास परब,राजेंद्र गावडे,मदन गावडे,दिगंबर गावडे आदींसह आसोली, पाल,मातोंड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page