मुंबई /-

सरकारने मला विकास कामांसाठी मदत करावी, या अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सहभागी झालो. असल्याचं एकनाथ खडसे यांनी आज म्हटलं आहे. तसेच, नाथाभाऊ हा स्वस्थ बसणारा नव्हता. असंख्य लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. तुम्ही जर तिकीट न देऊन घरी बसायची भाषा करत असाल, तर मला मान्य नाही. मी पदाचा भुकेला नाही. पदं मला अनेक येतात व जातात. असं देखील खडसेंनी यावेळी म्हटलं आहे.

भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मुंबईत जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आज जळगावमध्ये परतले, यानंतर ते मुक्ताईनगर येथे आल्यावर त्यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलाताना आपण भाजपा सोडण्याचा निर्णय का घेतला, याबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page