वैभववाडी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन भात पिकाची नासाडी झाली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी वैभववाडी तहसीलदार यांना दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवसांमध्ये सतत पाऊस पडूत तयार झालेल्या भात पिकाची नासाडी झाली आहे .वैभववाडी तालुका सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेलेला असल्याकारणाने तालुक्यातील 90 टक्के पेक्षा जास्त लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत .प्रामुख्याने वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पीक लागवड केली जाते. येथील शेती पूर्णतः पावसावर अवलंबून असते ,यावर्षी विचार केला असता दरवर्षीपेक्षा दीडपट जास्त पाऊस पडला आहे,वैभववाडी तालुक्यात तब्बल सरासरी 5000 मिलि मीटर पाऊस पडल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,भात शेती पावसाच्या पाण्यात वाहून गेलीआहे,तर काही गावात भात पाण्यात कुजून गेले आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे भात जमिनीवर पडून त्याला अंकुर आले आहेत .त्यामुळे भात पिकाची नासाडी झाली आहे .त्याचबरोबर भात पिकातून चाऱ्याच्या स्वरूपात मिळणारे गवत देखील बुजून गेले आहे.भविष्यात गुरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून महाविकासआघाडी सरकार मार्फत नुकसान भरपाई मिळावी म्हणून खा.विनायक राऊत , पालकमंत्री उदय सामंत आमदार,आ. वैभव नाईक यांचे मार्फत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे .यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके ,शहर प्रमुख प्रदीप रावराणे ,रवींद्र मोरे,भुईबावडा शहर प्रमुख राजू पवार ,प्रवीण गायकवाड, दीपक पवार, गणेश पवार, राकेश पवार आदि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो:वैभववाडी नायब तहसीलदार अशोक नाईक यांना निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके व शिवसेनेचे पदाधिकारी.छाया:( मोहन पडवळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page