सावंतवाडी /-

सिंधुदुर्गात ९ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर या चार दिवसांत पडलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे हाता तोंडाशी असलेले पीक, वाळत टाकलेले पीक वाहून व कुजून गेलेले आहे.

तसेच बागायतीतील फळझाडे पडलेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेती बागायतीच्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सावंतवाडी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page