कृषी महोत्सवाला केवळ जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारीचं उपस्थित तर शेतकऱ्यांनी फिरवली पाठ.
सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवाला महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचा या महोत्सवाला ‘जय महाराष्ट्र’…
सिंधुदुर्ग /-
सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवाला महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचा या महोत्सवाला ‘जय महाराष्ट्र’…सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवाला महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचा या महोत्सवाला ‘जय महाराष्ट्र’…सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवाला महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचा या महोत्सवाला ‘जय महाराष्ट्र’…
सिंधू कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन मेळाव्याला उदघाटक म्हणून कृषी मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत, असं जिल्हा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलं. मात्र, आज या मेळाव्याला कृषी मंत्र्यांनीचं पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आलं. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने योग्य नियोजन करणे आवश्यक होतं. तसेच हा महोत्सव ६ वा नसून ५ वा आहे. हे जिल्हा परिषद विसरल्याचे ठळकपणे दिसून आलं. दरम्यान या महोत्सवाला आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेला प्रसिद्धी मिळवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न फसला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महोत्सवाला गोरगरीब शेतकऱ्यांच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी करण्यात आली.