कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असलेल्या माणगांव खोऱ्यात पुन्हा एकदा अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला असून यामध्ये गोरगरिबांचे संसार मात्र उद्वस्त होण्याच्या मार्गावर असून अवैध धंदेवाल्यासहित संबंधित विभागाचे अधिकारीही मालामाल होत असं असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.परंतु माणगाव खोऱ्यामध्ये मोठ्याप्रमाणावर चालू असलेल्या अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.