सिंधुदुर्ग /-

प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी 31 मे ऐवजी 30 जून तारीख सेवा जेष्ठतेसाठी ग्राह्य धरण्यात यावी याबाबत शिक्षक परिषदेने सातत्याने निवेदने देऊन चर्चा घडवून तसेच न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केलेला होता त्या अनुषंगाने आज दिनांक 4 मे रोजी ग्रामविकास विभागाने याबाबत आदेश देत सन 2022 मध्ये होणाऱ्या बदली प्रक्रियेत प्राथमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता ही 31 मे ऐवजी 30 जून धरणेबाबत शासन आदेश निर्गमित केलेला असून राज्यभरातील शिक्षकांनी शिक्षक परिषदेवर आनंदाचा वर्षाव करीत अभिनंदन व शुभेच्छा दिलेल्या असून शिक्षक परिषदेने दिलेल्या प्रशासकीय व न्यायलीयन लढ्यास यश आल्याने अन्यायग्रस्त शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे

शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांचे ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांना निवेदन सादर

याबाबत शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर साहेब तसेच राज्य अध्यक्ष श्री राजेश सुर्वे यांनी ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांची दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी ग्राम विकास मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले होते सदर विषय हा राज्यातील 30 ते 40 हजार शिक्षकांसाठी कसा अन्यायकारक आहे ही भूमिका आमदार संजय केळकर साहेब व राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी सचिव महोदय यांच्या समोर मांडलेली होती त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सचिव श्री राजेश कुमार यांनी शिक्षक परिषदेत दिले होते

बदली अभ्यास गटाचे प्रमुख आयुष प्रसाद सिंग यांना राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांचे निवेदन सादर

शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष श्री पुरुषोत्तम काळे नाशिक विभागाचे विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल महिला आघाडीच्या सौ दीपमाला पाटील सौ सरिता काळे यांनी बदली अभ्यास गटाचे प्रमुख श्री आयुष प्रसाद सिंग यांची दिनांक 16 मार्च 2022 रोजी पुणे जिल्हा परिषद येथे भेट देऊन निवेदन सादर केले होते बदली प्रक्रियेत 2019 झाली बदली झालेल्या शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत भूमिका समजावून सांगताना यात प्रामुख्याने अतिदुर्गम भागात काम करत असलेल्या शिक्षकांवर कसा अन्याय होत आहे हे स्पष्टीकरण करून सांगितले होते दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन बदली अभ्यास गटाचे प्रमुख श्री आयुष प्रसाद सिंग यांनी शिक्षक परिषदेस दिले होते.

शिक्षक परिषदेतर्फे नाशिक विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल यांची न्यायालयात धाव न्यायालयीन लढ्यास अभूतपूर्व यश.

शिक्षक परिषदेच्या वतीने वारंवार निवेदने देऊन देखील 31 मे ऐवजी 30 जून तारीख धरण्यात विलंब होत असल्याने नाशिक विभागीय कार्यवाह श्री रामकृष्ण बागल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी ऍड बालाजी शिंदे साहेब यांच्यातर्फे पिटीशन क्रमांक 4689/2022 द्वारे याचिका दाखल केली होती ऍड बालाजी शिंदे यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद करीत याचिकेच्या प्रथम सुनावणीस मेहरबान उच्च न्यायालयाने शासनाला नोटीस बजावून आपले म्हणणे तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते सदर न्यायालयीन प्रक्रियेत शसनाच्या सचिवाला प्रतिवादी करता येत नसल्याचे सरकारी वकील यांनी न्यायालयात म्हणणे सादर केले होते तरीदेखील प्रथमच आपल्या या प्रक्रियेत आपले एडवोकेट बालाजी शिंदे यांनी ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना प्रतिवादी करत नोटीस बजावून शासनाचे म्हणणे सादर करण्याबाबत आदेशित केले होते.

शासनाने दिलेल्या उत्तरावर आधारित राहून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी याबाबत याचिककर्त्यांच्या बाजूने निकाल देत 31 मे ऐवजी 30 जून तारीख धारणेबाबत दिनांक 5 मे 2022 च्या आत निर्णय घेणेबाबत प्रतिवादी अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग यांना आदेशित केले होते

न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणे बाबत शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांचे अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग यांना निवेदन सादर

मेहेरबान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणेसाठी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार श्री राजेश पाडवी यांनी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून दिनांक 1 मे 2022 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत विनंती केली होती.

शिक्षक परिषदेचे नाशिक विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल व विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची भेट घेत न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणे बाबत शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांचे निवेदन सादर

नाशिक विभागाचे कार्यवाह श्री रामकृष्ण बागल विभागीय उपाध्यक्ष श्री राकेश आव्हाड यांनी ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांची दिनांक 2 मे 2022 रोजी ग्रामविकास मंत्रालयात भेट घेऊन न्यायालयीन आदेशाची प्रत सादर करून न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करणे बाबत शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष श्री पुरुषोत्तम काळे यांनी दिलेले निवेदन सादर केले या निर्णयाचे स्वागत करीत अप्पर मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांनी सदर या विषयास आम्हास न्यायालयीन आदेश मिळाल्याने आम्हास निर्णय घेताना सोपे जाणार असल्याचे शिष्टमंडळास सांगितले होते व लवकरच याबाबत आम्ही आदेश निर्गमित करू असे आश्‍वासन शिक्षक परिषदेस दिले होते बदली अभ्यास गटाचे प्रमुख श्री आयुष प्रसाद सिंग यांना न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल यांची कन्या दिव्या बागल हिने दिनांक 2 मे 2022 रोजी पुणे जिल्हा परिषद येथे जाऊन आयुष्य प्रसाद सिंह यांची भेट घेऊन न्यायालयीन आदेशाची प्रत देत न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणेबाबत निवेदन सादर केले होते शिक्षक परिषदेने केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यास करून प्रशासकीय व न्यायालयीन लढ्याच्या अनुषंगाने आज दिनांक 4 मे 2022 रोजी ग्रामविकास विभागाने सन 2022 मध्ये होणाऱ्या बदली प्रकियेत 31 मे ऐवजी 30 जून तारीख धारणेबाबत आदेशित केले असल्याने शिक्षक परिषदेने दिलेल्या प्रशासकीय व न्यायलीयन संघर्षमय लढ्यात यश प्राप्त झाल्याने राज्यभरातून शिक्षक परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page