वेंगुर्ला /-

आरवली ते वेंगुर्ले मेनरोड या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून ३० नोव्हेंबर रोजी पर्यंत संबंधित रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सदर रस्त्यावर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आरवली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा आरवली व सागरतीर्थ गावातील ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकारी यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ला यांना निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, की गेले दोन महिने आरवली ते वेंगुर्ला या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून सदर रस्त्यावर चालणे सुद्धा कठीण झाले आहे. सदर रस्त्यावर गाडी चालविणे अतिशय धोकादायक झाले आहे. सदर रस्त्यावर अपघात झाले आहेत आणि होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आपणास लेखी, तोंडी आणि मोबाईलद्वारे सूचना करून सुद्धा रस्ता दुरुस्त झालेला नाही. आरवली पंचक्रोशीतील वार्षिक जत्रोत्सव होणार आहेत आणि त्याकरिता येणाऱ्या भाविकांना त्रास होणार आहे.आजपर्यंत आपण रस्त्याबाबत दखल घेतलेली नाही म्हणून सागरतीर्थ व आरवली गावातील ग्रामस्थ आपणास नोटीस देत आहोत की, ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सदर रस्त्यावर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आरवली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सागरतीर्थ सरपंच एकनाथ कुडव, माजी सरपंच विठोबा  बागकर,आरवली तंटामुक्ती समिती अध्यक्ष मयूर आरोलकर,आरवली ग्रा.पं. सदस्य किरण पालयेकर, रवींद्र वराडकर, संतोष तांडेल, संजय आरोलकर, सागरतीर्थ ग्रा.पं.सदस्य पांडुरंग फोडनाईक, चंद्रशेखर तारी सागरतीर्थ तंटामुक्ती समिती अध्यक्ष किस्तू सोज आदींसह सागरतीर्थ, आरवली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page