औरंगाबाद /–
महिला सरपंचानी पदाला न्याय देण्यासाठी व जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती घेऊन गावागावात विकास कामांना गती द्यावी. पुरोगामी महाराष्ट्रात अनेक समाजसुधारकांच्या विचारातून विविध चालीरिती, प्रथा, परंपरा दूर करुन स्त्री शिक्षण व तिच्या विकासासाठी सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिल्याने समाजकारण व राजकारणात महिला सरपंच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरल्या आहेत. यासाठी या महिला सरपंच परिषदेच्या माध्यमातून वितरीत करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचा उपयोग महिला सरपंच विविध योजनां राबविण्यासाठी करतील, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महिला सरपंच परिषदेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.